राणी फक्त तुझ्यासाठी..
खूप काही असेल आणि आहे बोलण्यासाठी , पण फक्त शब्द तुझ्यापर्यंत पोहचतील अस नको वाटत जेव्हा मी तुझ्यात सामावून जाईल तेव्हा असेल खूप काही बोलण्यासाठी , जेव्हा तुझा हात हातात राहील तेव्हा असेल खूप काही सांगण्यासारखं , जेव्हा अश्रू पुसायला माझा खांदा असेल जेव्हा जगण disney वर्ल्ड वाटेल आणि आयुष्य कमी वाटेल पण तरीही असेल खूप काही सांगण्यासारखं , पण आजकाल काय झालंय न की फोन वर कितीही बोललं तरी आपण काहीतरी व्यक्त झालो अस नाही वाटत , त्याउलट बोलणं हे गैरसमज होण्याची भीती वाटते, संवाद साधून मन मोकळं करायला मी काही वाटेत भेटलेला unknown माणूस नाही किंवा जगातला स्वार्थी समाज नाही , मला माझं आयुष्य हवं आहे आणि माझं आयुष्य तू आहेस , आणि जेव्हा अस तुला मनापासून वाटेल तेव्हा असेल न खूप काही सांगण्यासारखं .... राणी फक्त तुझ्यासाठी.....
... ह्या बेअर्थी आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, एक सुवर्ण आठवण बनून जाते, अलौकीक स्वप्नांच्या दुनियेचा प्रत्यक्ष अनुभव अनुभवायला मिळतो, झालेल्या चुका सुधारुन नव्या हिंमतीने, प्रकाशगतीने आणि पुर्ण भानावर राहून उर्वरित प्रवास पुर्णत्वास आणायला शिकतो......
ReplyDelete🙌😊
Delete