"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2
चुकलोय का मी ?? माहीत नाही पण खूप दिवस झाले सतत मनाला अस्वस्थता वाटत राहते आपलं राज्य सोडून आपण आलोय खरं पण ज्या गोष्टी आपण सोडल्या आहेत जस की घर ,आई वडील ,भाऊ बहीण ,आजी आजोबा सर्वांपासून नकळत दूर जातोय त्यामुळे कधीकधी मनाला प्रश्न पडतो की खरच आपण वाट चुकलोय का? ह्या जगाच्या मायानगरीत हरवलो की काय ? आपण परत भेटू शकतो ना? की ह्या जगात कुठेतरी हरवून जाऊ 😢 तुम्हाला सांगतो जस माझं शिक्षण पूर्ण होतंय तसा तसा मी दूर जातोय सुरुवातीला डिप्लोमा complete झाल्यावर त्यानंतर आता इंजिनीरिंग संपल्यावर महाराष्ट सोडला पण खर सांगू का करिअर बनवायचं म्हटलं ना की काहीतरी आपल्या हातून सुटणार हे नक्की कारण ह्या competition च्या युगात जगायचं असेल तर आपल्याला धावायला लागेल .. बरं ठीक आहे आपल्याला मिळालाही एखादा settle जॉब पण ज्यांच्यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करतोय त्यांना परत मिळवता येईल का मला ?😢 मला घरी जायचंय! कुठलीही चिंता काळजी न करता निवांत शेतात माळरानात भटकायचं आहे, शेतात काम करायचं आहे, मनसोक्त आईच्या हातची रुचकर भाजी भाकरी चटणी खायची आहे ,रात्री आईच्या कुशीत झोपी जायचं आहे.. पण माझं हे स्
... ह्या बेअर्थी आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, एक सुवर्ण आठवण बनून जाते, अलौकीक स्वप्नांच्या दुनियेचा प्रत्यक्ष अनुभव अनुभवायला मिळतो, झालेल्या चुका सुधारुन नव्या हिंमतीने, प्रकाशगतीने आणि पुर्ण भानावर राहून उर्वरित प्रवास पुर्णत्वास आणायला शिकतो......
ReplyDelete🙌😊
Delete